Monday, March 14, 2011

मा.शरणकुमार लिंबाळे जी,
 अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण वाचले असता आपल्यावर रामदास आठवलेंचा विशेष प्रभाव जाणवतो. हे असे आहे, ते असे होते, हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे वगेरे वगेरे, मात्र या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं या करिता तुम्ही आपला ' पाहिजे ' खर्च करण्याचं बुद्धीपुरस्पर टाळलेल आहे. परंतु आंबेडकरी आंदोलनाशी कुठलही  नातं नसलेल्या यशवंतराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सारख्यांचा उल्लेख करून स्वतासाठी चोर दरवाजे शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे असं करायला न्हवत  पाहिजे.
                   

No comments: