Wednesday, July 20, 2011

अन्ना पे जरा सी राजनीती हावी हो गयी तो ओ अनशन पर बैठा लेकिन इन सूरमाओपर राजनीती इतनी हावी हो गयी की ये सब न्यूट्रल हो गए / शायद प्रधानमंत्री बनने के बाद ही अन्ना का विरोध करेंगे /

Thursday, June 2, 2011

"बेशर्मी के ठेकेदार"


आज अगर ग़ालिब होता तो यही कहता " राजनीती ने इन्हें निकम्मा कर दिया ग़ालिब वरना यह जानवर भी थे काम के " 

Monday, April 25, 2011

political bazar: मा सुनील जी, हे सुद्धा तपासून पहा

political bazar: मा सुनील जी, हे सुद्धा तपासून पहा

मा सुनील जी, हे सुद्धा तपासून पहा

मा सुनील जी,
कांशीराम, मायावती च कुठलही प्रकरण आल कि जागच्या जागेवर उड्या मारायच्या अस आपल वागण दिसत. काल पर्यंत अण्णा हजारेंच्या तथाकतीत समितीविषयी तुम्ही साशंक होते. मायावतीन मागणी करताच तुम्ही हि अण्णा च्या समितीत दलितांच्या सहभागाची री ओढू लागले आहात. दलितांच्या साक्षीने तुम्हाला या देशाच्या लोकशाहीचा आराखडा बदलावयाचा आहे कि काय ? १९७७ ते १९८६ पर्यंतचे अंका च्या निमित्ताने तुम्हाला पुन्हा उडी मारण्याची संधी मिळाली. पण उड्या मारण्या पूर्वी थोडं हे सुद्धा तपासून पहा.     
सुनील जी,
१९८४ मध्ये कांशीराम मधला राजकारणाचा किडा बाहेर आला व बसपा ची स्थापना झाली. त्यापूर्वी  कांशीराम नावाचा राजकारणी डी .एस फोर सारखं सामाजिक संघटन चालवायचा. त्याच काळात दलित पैन्थर, दलित मुक्ती सेने सारखे सामाजिक आंदोलनही अस्तित्वात होतीच. विविध सामाजिक,राजकीय समस्यांच्या प्रश्नावर अश्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनही सुरु असायचे तसेच दलित साहित्य चळवळ, दलित रंगभूमी द्वारे समाजाच्या सांस्कृतिक गरजानाही न्याय मिळण्याला मदत होत असायची.१९८४ चा काळ असा होता कि आंबेडकरी समाज स्वताची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी, तथागताच्या आदर्शावर आपली वेगळी संस्कृती निर्माण करण्यासाठी संघर्षरत होता. अजूनही या समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या. बोरकर सारखी अनेक प्रवृत्ती या समाजात वावरत होती. दादासाहेब गायकवाडा पासूनच इथल्या व्यवस्थेने कॉंग्रेस च्या माध्यमातून रिपब्लिकन नावाच्या आंदोलनाला कुमकुवत करण्याचा प्रयत्न चालविला होता.१९८४ च्या काळातही कॉंग्रेस सारख्या पक्षांनी गवई, आठवले सारख्यांच्या मदतीने या समाजाला राजकीय पाठ शिकवण्याचे प्रयत्न सुरू ठेवलेत व या समाजाचा सामाजिक ढाचा नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला परंतु गायकवाड असो की गवई, आठवले असो, यांची जडण घडण मुळात सामाजिक आंदोलनातून झाल्यामुळे व्  त्यांच्या मध्ये असलेल्या सामाजिक जाणीवेमुळे तसेच रिपब्लिकन पक्षाचा ढाचा फक्त राजकीय पक्ष नसून एक सामाजिक आंदोलनाचा असल्यामुळे, या समाजाचा सामाजिक ढाचा मात्र कॉंग्रेस सारख्या ब्राह्मणवाद्याना पूर्णपणे संपवता आला नाही पण अश्यातच एक चमत्कार घडला तो म्हणजे कांशीराम मधील राजकारणाचा किडा १९८४ मध्ये उजागर झाला व बी.एस.पी.ची स्थापना झाली. बोरकर प्रवृत्तीच्या हौशी कलावंताना एक वेगळं प्लेटफार्म मिळालं. हौश्या-नौश्यांचा पाठींबा मिळवत कांशीराम ने गोबेल्स च तंत्रज्ञान वापरीत बाबासाहेबांच्या एकाच विधानाचा प्रचार आपल्या पद्धतीने केला व येनकेन प्रकारे इथल्या माणसाला फक्त राजकीय पाठ शिकवणे सुरु केले. या समाजातील प्रत्येक माणसात राजकीय स्पर्धा सुरु केली. बाबासाहेबांच्या विधानाचा उपभोग घेत असताना बाबासाहेबांना कुठल्या आदर्शांवर राजकारण अपेक्षित होतं याची चर्चा मात्र कांशीराम किंवा आज मायावती करताना दिसत नाही. आंबेडकरी समाजावर कांशिरामच्या  या कृतीचा दुष्परिणाम असा झाला कि अनपढ माणसाच्या ......त असलेला राजकारणाचा किडा समाजाच्या संवेदनावर, नितीमत्तेवर, आदर्शावर वरचढ झाला व आंबेडकरी समाजाचा सामाजिक ढाचा पूर्णपणे बदलून गेला जे गवई, आठवले च्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेला कधी हि करता आल नाही. आज आंबेडकरी समाजाचं चित्र बघून आपण एवढ्या निष्कर्षा पर्यंत येवून पोहचतो कि एखाद्या समाजाला सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या संपवायचं असेल तर त्या समाजातील प्रत्येक माणसाला फक्त वर्तमान भारतीय राजकारण शिकवल कि झालं.  भाऊ लोखंडे च्या मुखातून जोडे चाटना-या संस्कृतीच उद्दातीकरण करणे व ते तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रात छापून आणने याच उत्तम उदाहरण आहे. याला असही म्हणता येईल कि, "अर्ध्या हळकंदात पिवळ होण" . असं करण्यामुळे  कुठल्या आंबेडकरी सांस्कृतिक मूल्यांच जतन झालं, होत आहे हे आपण तपासलं पाहिजे. आणि अश्या हौश्या नौश्या ला हाताशी घेवून तुम्ही संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तो सुद्धा चमत्कारच म्हणावा लागेल. हौश्या नौश्या च आणखी उदाहरण देतोच म्हटल तर सुरवातीला बसपा वाले आपल्या सभामधून एक गाणं म्हणायचे ते म्हणजे, ' ये कैसी तेरी जिंदगी बहुजन मेरे भाई'. बिचारा गद्दर! गाणं बनवीत असताना त्याने आपल्या गाण्या सोबत असा काही खिलवाड होईल असं स्वप्नातही बघितल नसेल.म्हणजेच, राजकारणासाठी एखाद्या चांगल्या गोष्टीचा कसा सत्यानाश करायचा हे बसपा वाल्याकडून शिकण्यासारखे असते हे वरच्या ओळीतून स्पष्ट होते.
मा.सुनील खोब्रागडे जी, अतिमहत्वकान्क्षेपायी, प्रसिद्धीसाठी व शेवटी राजकारणासाठी तुम्ही सुद्धा साहित्य, सांस्कृतिक चळवळीसोबत असच काही करताना दिसत आहात पण आंबेडकरी चळवळीतील सुज्ञ माणूस हे सगळ जाणतो. पैश्याच्या बळावर आपण काहीही करू शकतो असा जर आपला गैरसमज झाला असेल तर तो कृपया काढून टाका.समाज, काळ आणि चळवळ अत्यंत गाम्भिर्याने समजून घ्या आणि मगच काय तो निर्णय घ्या नाहीतर उबाळे, खोब्रागडे बावाजी, पाटील, खापर्डे, वैद्य आणि शेवटी सत्ता असूनही "बहुजन नायकाचे " काय झाले ? याचा विचार करा. 

Wednesday, April 13, 2011

anna hajare

अन्ना,
१० अप्रैल, रात १० बजे  IBN  न्यूज़ चैनल पर आपका interview सुना ! राजदीप ने चुनाव लढने के बारे में आपको सवाल पूछा, आपने जवाब दिया की यहाँ का मतदार जागृत नहीं होने की वजह से  मै अगर चुनाव लढ़ भी लू तो मेरी जमानत जप्त हो जाएगी ! आप जमानत जप्त होने की बारे में जितने शास्वत दिखे उतने ही यहाँ का मतदार जागृत नहीं होने के बारे में भी शास्वत दिखे ! ऐसे ही मतदार के बीच  भ्रष्टाचार को लेकर आपने एक जंग छेड़ी इसलिए आपकी जितनी तारीफ करो उतनी कम है लेकिन इस जंग की आपकी लढाई देखकर कई सवाल खड़े होते नजर आ रहे है ! मान लो आनेवाले दिनों में इस भारत में भाजपा की सरकार आती है और ऐसे ही सोये हुए मतदारो को साथ लेकर यही रास्ता यहाँ के साम्प्रदायिक ताकतोने राम मंदिर बनाने के लिए अख्तियार किया और संसद के पाच और समाज सेवक पाच तो उस वक्त  इस देश की हालत क्या होगी इस बारे में थोडा आपने सोचा होता तो बेहतर होता ! राम मंदिर के आन्दोलन में समाज सेवक पाच और सरकार के पाच कौन होगे यह तो आपको समजता ही होगा और इतनी समज आपको होनी भी चाहिए ! इस देश का चित्र क्या होगा यह सोचने की जरूरत है ! 
अन्ना , भ्रष्टाचार के साथ ही इस देश में कई बड़ी समस्या है, जातिवाद , दलितों पर अत्याचार, आदि. जब किसी दलित को जिन्दा जलाया जाता है, किसी नारी पर सरे आम बलात्कार किया जाता हो, उस वक्त यहाँ का कोई अन्ना , मिडिया , या कोई समाजसेवक इतना जागृत नहीं दीखता ! आपके ही महाराष्ट्र में खैरलांजी का हत्याकांड हुआ ! आज भ्रष्टाचार के मुद्दे पर आप के साथ जितने लोग सड़क पर उतरे उससे पाच गुना लोग बलात्कारी को सजा देने की लिए सड़क पर सात दिन अपना आन्दोलन  करते रहे ! उस वक्त यहाँ के समाज सेवक , मिडिया , और आप की देशभक्ति कहा थी ? यह सवाल आज खड़ा हो रहा है ! फिर आपके के पीछे ऐसे कौन लोग है जो अचानक से सोये हुए लोगो में , मिडिया में इतनी देशभक्ति का निर्माण किया ? आप ने अपने मंडप में माता की तस्वीर लगा रखी थी जिस की भारत की संविधान में कही जगह नहीं, साथ ही आपके आन्दोलन कारी अनुपम खेर संविधान को उखाड फेकने की बात करते है और आप के लोग अनुपम खेर के साथ होने की बात करते है उस वक्त ऐसे सोचने के लिए मजबूर होना पड़ता है की इस आन्दोलन की बागडोर आप के हाथ में नहीं है ! आप को सिर्फ एक मोहरा बनाकर पेश किया जा रहा है ! भ्रष्टाचार इस देश से ख़त्म हो ऐसा हर नागरिक को लगता है ! लेकिन संविधानिक तरीके से इसका निर्मूलन होना चाहिए ! सरकार के नुमायिंदे तो संविधानिक तरीके से चुने हुए होते है लेकिन समाज सेवक को चुनने का संविधानिक तरीका क्या होगा ? फिर चार लोगो ने सोये हुए मतदारो को साथ लेकर किसी बात के लिए आन्दोलन छेड़ा और मिडिया को किराये पर लेकर सरकार पर दबाव बनाया उस वक्त पाच समाज सेवक उनके ही होगे !क्या यह बात संविधानिक होगी ? 
अन्ना , गाँधी जयंती के अवसरपर मरीज को सेफ , अंगूर खिलानेसे इस देश का भ्रष्टाचार ख़त्म होनेवाला नहीं ! उस मरीज को सेफ और अंगूर कमाने के लायक बनाना होगा ! गांधीजी ने समाज सेवा को महत्व दिया था तो डा आंबेडकर ने समाज के परिवर्तन को जरुरी समजा था !

Friday, April 8, 2011

sahitya sangiti

आयु. सुनील खोब्रागडे जी,
दि. ३ व ४ एप्रिल २०११ रोजी तुमच्या अ. भा.मराठी साहित्य महासभेने  आयोजित केलेल्या  अ. भा. मराठी  साहित्य संगीती चे अध्यक्ष भाऊ लोखंडे याचं भाषण आपल्या महानायक मधून प्रकाशीत झाले.  सोबतच भाऊ लोखंडे च्या भाषणाचा सार सुद्धा महानायक  मधून वाचायला मिळाला. या संगीतीच्या अध्यक्ष पदावरून बोलताना भाऊ लोखंडे बोललेत कि ' ज्या राज्यात अस्पृश्यांना स्वाभिमानाने जगता येत न्हवते, आज त्या राज्याच्या एका चांभार महिलेच्या जोड्याला चुम्बताना ब्राह्मणांना बघत आहोत ' हा चमत्कार नाही का ? असे असताना आजही सत्ताधाऱ्यांच्या मनातील जातीवाद गेला नाही'. भाऊच्या वरील वाक्यात महानायक ला संविधानिक मूल्य सापडलेत हा सुद्धा एक चमत्कार दिसतो आहे. मायावती मुख्यमंत्री आहे म्हणून ब्राह्मण  जोडे चुम्ब्तात किंवा  मायावती चांभाराची पोरगी आहे म्हणून तिचे जोडे चुंबत असतील, शेवटी प्रश्न निर्माण होतो तो जोडे चुम्ब्ण्याचा. एखाद्या मुख्य मंत्र्याची जात सांगण्याचा अधिकार तेहि जोड्याच चुंबन घेण्याच्या संदर्भात संविधानाच्या कुठल्या कलमात येतो याचा उल्लेख मात्र महानायक किंवा भाऊनी केला नाही. 
  पण सुनील जी असही असू शकते कि यु पी तले ब्राह्मण मायावतीकडून ब्रह्मा विष्णूचा नारा लावून घेतात आणि  मिश्रा नावाच्या ब्राम्हणाला  बसपा च्या मंचावरून जय परशुराम चा नारा लावण्याची संधी देतात  म्हणून ब्राम्हण तिचे जोडे चुंबत असतील तरी सुद्धा शेवटी प्रश्न एकच उरतो तो म्हणजे " जोडे चुम्बण्याचा ". त्यासाठी बसपा वाल्यांना एवढ पिवळ होण्याची गरज काय? हि बाब किती संविधानिक आहे हे तुमच्या सारख्या प्रशासकीय अधिकारी राहलेल्या माणसाला कळू नये याला ' चमत्कार ' म्हणायचं कि ' राजकारण ' हे तुम्हीच ठरवावं पण राजकीय उद्देश मनाशी बाळगून संविधानिक मुल्यांवर साहित्य निर्मिती अशी जी काही  मजाकबाजी तुम्ही सुरु केली ती मात्र निंदनीय आहे. या नंतर कोणत्याही रिपब्लिकन नेत्याला शिवा देण्याचा संविधानिक अधिकार जरी तुमच्याकडे असेल पण नैतिक अधिकार तुम्हाला आहे असे मला वाटत नाही. फक्त मायावती चार वेळा मुख्यमंत्री झाली म्हणून, किंवा खोब्रागडे न वृत्तपत्र सुरु केल म्हणून किंवा महानायक चळवळीतल्या माणसांना हजारो रुपयांचे पुरस्कार देतो म्हणून बसपा वाल्यांना शिवी देण्याचा अधिकार प्राप्त झाला असा जर कुणाचा गैरसमज होत असेल किंवा झाला असेल तर त्या माणसांनी अजून आंबेडकरी आंदोलन समजून घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे. 
       सुनीलजी, बाबासाहेबांच्या काळात पैसेवाले लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत. त्या नंतरच्याही काळात  पैसेवाले लोक विचारवंतांच्या, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहून चळवळीला पाठींबा देत असायचे.  पण कांशीराम नावाच्या बिमारीपासून समाजातील, चळवळीतील  नितीनियमच लयास गेल्याचे निदर्शनास येत आहेत. चळवळी मध्ये दिवसेंदिवस चमत्कारच होत आहेत. याच नुकतच चांगल उदाहरण म्हणजे तुमच्या साहित्य संगीतीच  अध्यक्षीय भाषण. तुमच्याकडे असलेला पैसा किंवा माध्यम याचाच परिणाम कि काय भाऊ लोखंडे सारखा तथाकतीत विचारवंतहि सुनील खोब्रागडे साठी हरभऱ्याच झाड घेऊन आलेला दिसत आहे. हा सुद्धा एक चमत्कारच म्हणावा लागेल. जोडे चाटनारी, जी हुजुरी करणारी संस्कृती मात्र तुम्ही आपल्या वृत्तपत्रातून छापू शकता पण तिसऱ्या आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष अमरावतीचे सतेश्वर मोरे तुमच्या संमेलनात " संविधानमूल्य आणि साहित्य " यावर जे काही बोलले ते मात्र छापण्याची तसदी तुम्ही घेतली नाही. म्हणजे 'घर कि मुर्गी दाल बराबर' असच महानायकच वागण समजायला हरकत नाही.

Thursday, March 31, 2011

मा. निखील वागलेजी,
काही लोकं फटाके फोडून आपल्या देशभक्तीचा परिचय देत असतात. काल भारताने पाकिस्तान सोबतचा क्रिकेट सामना जिंकला व भारतामध्ये पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी झाली. या पूर्वीही भारत-पाकिस्तान सामन्या  दरम्यान भारताच्या विजयावर अनेकदा फटाक्यांची आतिषबाजी बघायला मिळाली परंतु पाकिस्तान सोडून इतर देशासोबत भारत विजयी झाला तेव्हा मात्र फटाक्यांची आतिषबाजी करून देशभक्ती चा परिचय देणारे फार कमी उदाहरण दिसतात तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो कि खरच भारताने क्रिकेट सामना जिंकला म्हणून फटाके फुटतात कि पाकिस्तान भारतासोबत सामना हरला म्हणून फटाके फुटत असतात ? आजही २१ व्या शतकात भारतीय माणूस देशभक्तीचा परिचय देताना कुणाच्या पराभवावर फटाके फोडत असेल तर याला जबाबदार कोण ? याचं विश्लेषण कधी होणार कि नाही ? क्रिकेट ला राजकारणाशी जोडू नये फक्त एवढ बोलून कस चालणार ?

Monday, March 14, 2011

मा.शरणकुमार लिंबाळे जी,
 अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण वाचले असता आपल्यावर रामदास आठवलेंचा विशेष प्रभाव जाणवतो. हे असे आहे, ते असे होते, हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे वगेरे वगेरे, मात्र या साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणावं या करिता तुम्ही आपला ' पाहिजे ' खर्च करण्याचं बुद्धीपुरस्पर टाळलेल आहे. परंतु आंबेडकरी आंदोलनाशी कुठलही  नातं नसलेल्या यशवंतराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे सारख्यांचा उल्लेख करून स्वतासाठी चोर दरवाजे शोधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे असं करायला न्हवत  पाहिजे.
                   

Monday, February 28, 2011

prof. sateshwar more

प्रा.सतेश्वर मोरे यांनी आयु सुनील खोब्रागडे यांना मराठी साहित्य सभेविषयी लिहलेले पत्र , 
आयु. सुनीलजी,
आपले विचार वाचले, एक नवी सांस्कृतिक प्रक्रिया आपण गतिशील करीत आहात याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! मुळात आपण प्रतिक्रियावादी नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. कोणताही विचार किंवा प्रवाह काळाशी सुसंगत असण्यासाठी त्याची कालोचीतता अधिक नेमकेपणाने अधोरेखित करणे गरजेचे असते. आपण मराठी साहित्यासभा हा एक पर्याय सूचित केला. या सगळ्या प्रवाहाना एकत्रितपणे बांधण्यासाठी तो पुरेसा ठरेल यात शंकाच नाही. पण त्यांना केवळ एकत्रित बांधणे एवढेच पुरेसे नाही, कारण यातून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायमच राहील, नव्हे ते त्या प्रवाहांमध्ये कार्यरत असणारया कार्यकर्त्यांसाठी कायम असणे गरजेचे असते. कारण त्यातच त्यांचे अस्तित्व आणि सामाजिक ओळख निहित असते. म्हणून आपला प्रवाह टिकावा यासाठीच त्यांचे प्रयत्न कायम सुरु राहतील. ते प्रवाह कायम टिकले तरी आपला तोटा काय? उलट ते वेगवेगळे असले तरी त्या त्या विचाराचे प्रवाह या सभेच्या माध्यमातून आपल्या सोबतच असतील, त्यामुळे आपले बळ वाढेल. असा विचार आपण करू शकतो. पण असा विचार करणे तत्विकता बरोबर आहे काय? अजिबात नाही ही तात्त्विक तडजोड ठरेल. आणि अशा तडजोडीतून आपल्या हाती फारसे काही लाभत नाही हे एक आणि दुसरे असे की, राजकीय संदर्भात ह्या तडजोडी बरोबर असल्यातरी सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भात त्या टाळणे गरजेचे असते कारण यातूनच पुढे संस्कार आणि संस्कृतीच नव्हे, तर पुढच्या चळवळी गतिशील होत असतात. म्हणून या संदर्भात विचार करताना आपण अत्यंत काळजीपूर्वक केला पाहिजे असे मला वाटते. आतापर्यत विदर्भात (दुसरीकडे शक्य झाले नाही म्हणून किंवा विदर्भाबाहेर त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून) दहा अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाची आयोजने झाली. वामनदादा हे १९९३ मध्ये संपन्न झालेल्या वर्धेच्या पहिल्या अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते; आणि त्या नंतर अरुण कांबळे , बाबुराव बागुल. यशवंत मनोहर , लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे, गंगाधर पानतावणे, उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे या सगळ्या मान्यवरांनी या संमेलनाची अध्य्क्षस्थाने भूषविली आहेत. अर्थात यांनी आंबेडकरी साहित्य ही संज्ञा मान्य केली, असून तोच भारतीय साहित्याचा मुख्य प्रवाह आहे असे प्रतिपादन केले ; आणि सगळ्या साहित्य प्रवाहांची या प्रवाहाशी आपली नाळ जोडली गेली आहे असे स्पष्टपणे जाहीर केले. मी हे यासाठी सांगतो आहे की, आपण जेव्हा एखादी संकल्पना किंवा व्यवस्था नाकारतो. तेव्हा कालोचीत अशी व्यापक नवी पर्यायी व्यवस्था देणे गरजेचे असते. गेल्या १९९३ नव्हे तर १९८३ पासूनच हा विचार पुढे आला होता तो ९३ पासून प्रत्यक्षात आला आणि गेल्या २१ सप्टेंबर २००८ मध्ये ही संमेलन ज्या संस्थांनी आयोजीत केली होती त्या सगळ्या संस्थांच्या अध्यक्ष आणि सचिव अशा प्रत्येकी दोन प्रतिनिधींची बैठक अमरावतीला संपन्न झाली. त्यात या संमेलनाची सुसंगतता आणि त्याची आयोजने नियमित व्हावी आणि सांस्कृतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थांचे त्यासाठी एकसंघ असणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन एका अ.भा.आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाची स्थापना करण्यात आली. हे महामंडळ संस्थांचा संघ म्हणून काम करेल त्याच्या संस्था सभासद असतील आणि त्या संस्थांचे दोन प्रतिनिधी या महामंडळाच्या आमसभेला निमंत्रित असतील. ह्या महामंडळाची अजून नोंदणी झाली नाही. अशाप्रकारे ही प्रक्रिया गतिशील असून अमरावतीचे संमेलन हे महामंडळाचे स्थानिक संस्था आशय ने आयोजित केले होते. याच महामंडळाच्या वतीने दोन आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलने आणि तीन आंबेडकरी युवा साहित्य संमेलने आयोजित केली नुकतेच वर्धेला तिसरे युवा संमेलन आयोजित केले होते. ही प्रक्रिया अधिक व्यापक होणे गरजेचे आहे. ज्यातून पुढे नागपूर सारखे प्रकरण होणार नाही मुळात सगळेच आपापले तंबू साभाळत आहे. जोपारायात आपला प्रवाह व्यापक होणार नाही तोपर्यंत त्यांचे तंबू सांभाळणे थांबणार नाही. असे असले तरी केवळ आपण त्यांच्या तंबुंचाच विचार करीत नाहीतर आंबेडकरी विचार हा सार्वभौम आणि सर्वव्यापी असा विचार आहे ज्यात सगळेच विचार प्रवाह समाविष्ट आहे आपण आंबेडकरी असणे म्हणजे फुलेवादी असणे शाहुवादी असणे सगळ्या ग्रामीण पुरोगामी विचाराचे आपण पायिक असणे, हे जर मान्य केले तर आंबेडकरी साहित्य आणि विचार हाच सर्वव्यापी साहित्य विचार आहे हे मान्य करणे गरजेचे आहे. हेच अधिक कालोचित आहे असे मला वाटते कारण जेव्हा आपण दलित साहित्य ही संज्ञा प्रस्थापित केली त्यावेळी नामदेव कांबळे सारखा संघाचा माणूस केवळ दलित जातीत जन्माला आला म्हणून दलित साहित्यिक झाला होता असे घोटाळे आता आपण टाळले पाहिजे आणि अधिक विचाराशी सुसंगत झालो पाहिजे. म्हणूनच आंबेडकरी ही संज्ञा अधिक कालसंगत आहे असे माझे मत आहे. आपण आता हा नवा प्रवाह गतिशील करीत आहात. आपणास शक्य असेल तर या सभेला अ. भा. आंबेडकरी मराठी साहित्य महासभा आणि जे संमेलन आपण मार्चमध्ये भरवत आहात त्या संमेलनाला आंबेडकरी मराठी महासभेचे अकरावे अ.भा. आंबेडकरी साहित्य संमेलन असे नाव द्यावे. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आणि यातून आपण अधिक व्यापक व तेवढेच अधिक विचारशील होत आहोत हे लक्षात घ्या! कारण आंबेडकरी विचार, आंबेडकरी संस्कृती, आंबेडकरी संस्कार, आणि आंबेडकरी माणूस म्हणूनच जगात आपली स्वतंत्र आणि स्वायत ओळख आहे हे लक्षात घ्या. ही आपली ओळख आपल्या सांस्कृतिक आयोजनातून अधिक स्पष्ट आणि स्वच्छ व्हावी एवढीच अपेक्षा! 
जयभीम 
सतेश्वर मोरे 
sateshwarmorey@gmail.com

bhalchandra mungekar

आयु. मुणगेकर सर,
बाबासाहेबांनी दिलेल्या आर. पी. आय. ला डावलून स्वताच्या स्वार्थासाठी कॉंग्रेसी सत्तेत सहभाग मागून बहुजनांचे प्रश्न सुटणार का ? मुणगेकर सर, रिपब्लीकन पक्ष आपला बाप आहे व रिपब्लीकन जनता आपली आई आहे तेव्हा आपला बाप जर बिघडला तर त्याला दुरुस्त करण्यातच तुमची माझी मर्दानगी असणार, पण बाप बिघडला म्हणून आपल्या आईला म्हणण कि तू बाजुवाल्याला बाप बनव म्हणजे कॉंग्रेस, राष्ट्रवादी, बसपा वगेरे वगेरे तेव्हा याला काय म्हनाव? मला वाटते आपण आपली बुद्धी दिशाहीन झालेल्या रीपब्लीकन नेत्यांना मार्गावर आणण्याकरिता वापरावी, तुम्हाला यश निशचीतच येणार. स्वताच्या सोयीसाठी कॉंग्रेस मध्ये सहभागाचा संदेश देवू नये.

Saturday, February 26, 2011

marathi sahitya sangiti

आयु. सुनील खोब्रागडे सर
आपल्या साहित्य विश्वात एकच प्रवाह आहे तो म्हणजे " आंबेडकरी साहित्य ". आजपर्यंत अकरा अ भा दलित साहित्य संमेलन झालीत व त्यानंतर पंधरा आंबेडकरी साहित्य संमेलन झालीत.     सर्व संमेलनाच प्रेरणास्त्रोत बाबासाहेब आंबेडकरच आहेत. या पन्नास वर्षात कुणीही मराठी साहित्य संमेलनाचा ध्यास पकडला नाही. प्रस्थापितांच्या मराठी साहित्य विश्वाला पर्याय म्हणून सुरवातीला दलित व नंतर आंबेडकरी असं साहित्य विश्व निर्माण केल.
खोब्रागडे सर, तुम्ही उंदीर खावून जगलेत, आठव्या वर्गात असताना तुम्ही पहिल्यांदा पायात चप्पल घातली हाच विषय आपल्या साहित्य निर्मितीचा गाभा होता. पण असं दिसते कि असे लोक पैसेवाले झाले व सभोवताल चार लाभार्थी जमा झाले कि लगेच आपल नवं  दुकान सुरु करतात व बहुजन, सर्वजनाची स्वप्नही पडायला लागतात आणि हे सर्व कपड्यांची क्रीझ मेंटेन करून करतात. त्यातलाच तुमचा मराठी साहित्य सभेचा उपद्रव दिसतो. तुम्ही आयोजित करीत असलेल संमेलन सर्वजनपदी असल्याच घोषित करून मायावती साठी महाराष्ट्रात जमीन तयार करण्याची तुमची मानसिकता सुद्धा सिद्ध झालेली आहे. 
महाकवी वामनदादा कर्डक यांची एक गोष्ट सांगतो, १९९३ ला पहिल्या अ भा आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी स्वताविषयी फार अभिमानाने एक वाक्य उदगारल होत ते म्हणजे " मी फकीर आहे पण आंबेडकरवादी " तेव्हा खोब्रागडे सर तुमच्याकडे तर चार पैसे आलेत तर मग तुम्हाला स्वताला किंवा संमेलनाला आंबेडकरी म्हणवून घेण्यास कुठली अडचण येत आहे? म्हणजे येनकेन प्रकारे बहुजन,सर्वजन व शेवटी याच राजकारण असच न ! आणि असच आहे तेव्हा ओशो रजनीश, बसपा च उत्कृष्ट मिश्रण असलेले भाऊ लोखंडे तुमच्या संमेलनाचे अध्यक्ष होत असतील तर नवल कसलं ? 
मायावतीन बाबासाहेबाच्या हत्तीचा गणेश केला, तुम्ही आता साहित्याचा ज्ञानेश्वर करायला निघालेत. हा उपद्रव बाबासाहेबांच्या २२ प्रतीज्ञांशी तडजोड नाही का ? 
अधिकाऱ्यांची, उद्योगपतींची विना अनुभवाने आंदोलनात डायरेक्ट एन्ट्री झाली कि असे प्रदूषण येणारच.