मा. निखील वागलेजी,
काही लोकं फटाके फोडून आपल्या देशभक्तीचा परिचय देत असतात. काल भारताने पाकिस्तान सोबतचा क्रिकेट सामना जिंकला व भारतामध्ये पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी झाली. या पूर्वीही भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान भारताच्या विजयावर अनेकदा फटाक्यांची आतिषबाजी बघायला मिळाली परंतु पाकिस्तान सोडून इतर देशासोबत भारत विजयी झाला तेव्हा मात्र फटाक्यांची आतिषबाजी करून देशभक्ती चा परिचय देणारे फार कमी उदाहरण दिसतात तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो कि खरच भारताने क्रिकेट सामना जिंकला म्हणून फटाके फुटतात कि पाकिस्तान भारतासोबत सामना हरला म्हणून फटाके फुटत असतात ? आजही २१ व्या शतकात भारतीय माणूस देशभक्तीचा परिचय देताना कुणाच्या पराभवावर फटाके फोडत असेल तर याला जबाबदार कोण ? याचं विश्लेषण कधी होणार कि नाही ? क्रिकेट ला राजकारणाशी जोडू नये फक्त एवढ बोलून कस चालणार ?